Wednesday, August 22, 2012

या देशाचा आज-काल काय भरवसाच नाय

 
काय करतो आपण आणि होतं काय
या देशाचा आज-काल काय भरवसाच नाय...

राजकारणाच्या तव्यावर नेत्यांची पोळी,
कोणिही उठून रोज पब्लिक प्रोर्पटी जाळी
कोण बरोबर कोण चुक, कुणावर आता विश्वासच नाय....

अतिरेकी इथे दिवसा ढवळ्या घालतात गोळ्या
पब्लिक प्लेस, पोलिसांची घरं, चार भिंतीना जाळ्या
कुठे होइल फायरींग, कुठे पडेल बॊंम्ब, आता कसला हिशोबच नाय....

तरीसुद्धा आपण साजरा करतो स्वातंत्र्य दिवस
ज्या देशात देशाचाच ना कुणी उरलाय वारस
जो तो स्वातंत्र्य दिवसाला पसरून पडलाय हात-पाय.....

नाही जनाची तर असावी मनाची तरी लाज
स्मरावे एकदातरी हुतात्म्यांना ज्यांनी चढवला भरतावर स्वातंत्र्याचा साज
ठरऊ मिळून सारे किमान आज तरी तिरंगा रस्त्यावर पाडायचा नाय.....

काय करतो आपण आणि होतं काय,
या देशाचा आज-काल काय भरवसाच नाय...
-
ऋतू

Tuesday, August 21, 2012

खडू

(एक बाल कविता)
 
शाळेतल्या मास्तरांवर खडू बसला रुसून
म्हणतो कसा फळ्यावर लिहून मला टकतात पुसून.
 
 
कार्यक्रमाचे बोर्ड ह्यांच्या ठळक जाडे-भरडेजरासुद्धा
ठेवत नाहीत इकडून-तिकडून कोरडे.
 
मुलं तर फार द्वाडपणा करतातसांडून
शाई वह्यांवर मला त्यात रंगवतात.
 
नेने मास्तरही तसेच कहर करतातवर्गात
लिहीणे कमी आणि तुकडे करुन मारतात.
 
ह्या सगळ्यांची कंप्लेंट त्याने हेडमास्तरांकडे केलीवर्गात
मारून बुट्टी त्याने मास्तरांची फजीती केली.
 
मग हेडमास्तरांनी खडूला शांतपणे समजावलेसार्‍या
वर्गासमोर त्यानी खडूचे गुण गायले.
 
शाई घेतो शोषून तुमच्या चुका घेतो पोटातपांढरा
शुभ्र रंग काही नसतं निर्मळ मनात.
 
झिजून स्वत: तो तुम्हाला शिकवण देतोमुलांना
शिक्षीत करण्यात तो पूर्ण योगदान देतो.
 
ऐकून कौतूक त्याचे आभाळ ठेंगणे झालेआणि
तडक जाउन त्याने वर्गाचे दार गाठले.
 
आता खडूला कोणी-कोणी त्रास देत नाहीआणि
कुठल्याच तासाला खडू दांडी मारत नाही...
-
ऋतू

क्षितीज



पृथ्वीच्या निर्मीतीपासून उभं असलेलं क्षितीज आता दमलयं
रोजचा सूर्योदय आणि सूर्य़ास्त हल्ली झेलत नाही ते बरोबर
म्हणे...सूर्य़किरणांमध्ये भेसळ येते...

समुद्राचं पाणी आडवताना तडे जातायत आज-काल त्याला
म्हणे...लोकांनी कृत्रिम पध्द्तीने लिंपलेल्या
सीमेंटमध्ये भेसळ येते...

नेहेमीसारखं इंद्रधनू उतरत नाही आता क्षितीजावर
म्हणे... वाळू-माती उपसून उपसून
क्षितीजाला खड्डे पडलेत....

क्षितीज दिसत नाही पिवळं-सोनेरी किंवा तांबड
पांढर फटक पडत चाललयं रोज
भेसळयूक्त पृथ्वीत क्षितीज तरी कसं रंग बदलणार?

क्षितीज आता वाट बघतयं पृथ्वीच्या नवनिर्मीतीची
पृथ्वी बंद होवून चालू झाल्यावर तरी
सगळं सुरळीत होइल या आशेने!

-ऋतू

Monday, August 6, 2012

बारिश...

दूर तक आसमान नीला और धुला था
जिस वक्त सुबह ने आंखें खोलीं
घरों की मुंडेरों ने बताया... कुछ देर पहले बारिश हुई थी
 

किसी पत्ते पर ठहरी थी खूबसूरत बूंद
इंद्रधनुष की गोलाई लिए....धीरे से आगे बढ़ी
पत्ता हिला था हल्का सा... या उसका दिल धड़का था?
 

बूंद बही अपनी निशानी छोड़कर,
आखिरी सिरे पर जा टिकी...
फिर कहां रुकने वाली थी वो चंचल बूंद
 

पत्ता झुककर देखता रहा धरती की ओर...
मिट्टी में उसको मिलते हुए
पत्ते और भी थे शाख पर, सब चुप रहे
ये खेल देखकर हवा भी देर तक थमी रही
 

बारिश के बाद यही होता है अक्सर
ये जीवन का चक्र कहां रुकता है
हवा का नर्म झौंका है...
पत्ते ने मुस्कुराकर आसमान को देखा
सावन है...बारिश फिर होगी...

 
-कुहू 

बिछडा बादल...


बारिश का मौसम गए हुए एक अरसा गुजर चूका था
पिली धुप चेहेक रही थी आसमान साफ़ हो चूका था


जमींन की बढ़ी हुई झुरिया बारिश के पानी से मिट गई थी
उसका चेहरा खिल-खिला रहा था क्युके
उसकी मिटटी में पड़ी दूरियों की दरारे मिट गई थी

पेड़ो का भी कुछ एसा ही हल था
बरसो पुराने पेड़ आजकल नहायेसे लग रहे थे
उनकी पत्तो की सरसराहट मे कुछ था शायद,ध्यान से सुना तो पता लगा
के वो आज भी बूंदों की गझल गुनगुना रहे थे

सब कुछ ठीक ही था मगर न जाने
कहासे एक बादल वहापे आया
यहाँ-वहा देख कर क्यों न जाने फुट-फुट के रोया

उसकी आसुओ मे फिरसे भीग गया सब कुछ
पत्ते थरथराने लगे,जमीं का खुबसूरत चेहरा कीचड़ मे तब्दील हो गया
मैंने घुस्से से उसे पूछा
क्यों किया तुने एसा? क्या पाया?
तब एक थरथराते हुए पेड़ ने मुझे कहा
मत बोल उसे कुछ वो शायद डर गया है
भूल गया?तेरा भी तो साथ छोड़ा था किसी अपनेने बिच मे
 ये भी शायद तेरी तरहा बिछड़ गया है...

अभिजीत विठ्ठल शिंदे.