Tuesday, August 20, 2013

विचार

विचार
विचार एकमेकांना भिडले कि मनात त्यांच द्वंद्व चालू होतं...
कित्येक वेळा मेंदूच्या सर्व नसांना विळखा घालून बसतात हे विचार..
नाहीतर डोळ्यातले स्वप्नांचे ढग पिळून त्यात भिजतात मस्तवाल साले..

समाजाच्या, नात्यांच्या चौकटीत तुम्ही आलात
की विचारांना खिरापतच मिळते जणू, धावतात हावरटा सारखे तूमच्या मेंदुत..
कोंबड्यांनी टोचून-टोचून अन्नं खावे तसे तुमचा मेंदू संपवतात टोचून-टोचून..

त्या वेळी तुमची कृती काय आहे हे मन ठरवते,
चुकलात तर तुम्हीच नालायक,
 बरोबर असाल तर सभ्य, सोशिक माणूस
असा काटेरी मुकूट चढवतो समाज
आणि परत ढकलतो विचारांच्या दुष्ट चक्रात....
-ऋतु

No comments:

Post a Comment