Wednesday, December 14, 2011

और तो कोई बस ना चलेगा...


और तो कोई बस ना चलेगा हिज्र के दर्द के मारो का
सुबह का होना दुभर कर दे रस्ता रोक सितारोका
[हिज्र- Seperation दुभर- Difficult]

 झुठे सिक्को में भी उठा देते है अक्सर सच्चा माल
शक्ले देख के सौदा करना काम है इन बंजारोका


अपनी जुबॉँ से कुछ ना कहेंगे चूप ही रहेंगे आशिक लोग
तुमसे तो इतना हो सकता है पुछो हाल बेचारोका


एक जरासी बात थी जिसका चर्चा पहुचा गली गली
हम गुमनामो ने फ़िरभी एहसान ना माना यारोका


दर्द का कहना चिख उठो दिल का तकाज़ा वझा निभाओ
सब कुछ सहना चुप चुप रहना काम है इझ्झतदारोका
[दिल का तकाज़ा वझा- Heart's demand of self respect]

 - इब्न-ए-इन्शा

Wednesday, November 23, 2011

अंधेरा...

अंधेरा...

बचपन में सुना था मुहावरा
दियेतले अंधेरा
तब सही मायने पता चले...
अब जब सोच रोशन हुई,
तब पुछा अपने आप से,
क्या है वजूद अंधेरे का?
उस वजूद का इकरार इस दिवाली हुआ...
पता चला क्युँ अंधेरा युँ
दबे पाँव, दियेतले सहमा-सहमा रेहेता है,
क्युँ कसूरवार बच्चे की तरह
यूँ डरा-डरा फ़िरता रेहेता है!
हमने तो यूँ रोशनी के लिये
दरवाजे- खिडकीया सब खोल दी,
अंधेरे के लिये उन्हीके बगल में दिवारे बना दी,
अब जब दरवाजा खोलतेही,
सामने रोशनी पातेही हम उसे गले मिलने जाते है,
अंधेरा दबे पाँव, चूप चाप से
अपनी परछाई बनके अपने पैरो से लिपट जाता है...
हम तो रोशन होते है, अंधेरा पैरोतले कुचल जाता है!

-प्रथमेश किशोर पाठक

Tuesday, November 8, 2011

देव म्हणजे एक IT firm आहे

 देव म्हणजे एक IT firm आहे

देव म्हणजे एक IT firm आहे आणि आपण त्याचे client.
आता अश्या वेळी आपल्या आयुष्याचे Project किंवा Maintenance कसा होईल?

पहिल्यांदा आखला जाईल तो Project Plan.
आपल्याला कुठल्या जातीत, कुठल्या Class मध्ये जन्माला यायचं आहे?
Aggrement, clauses आणि packages ठरतील,
त्यानूसार Implimentation होईल आणि आपण जन्माला आल्यावर पहिलं वर्ष AMC (Annual Maintenace Contarct) free मिळेल.

AMC मध्ये तुमचा श्वास चालू राहिल ह्याची जबाबदारी घेतली जाईल फक्त...
Part ची Guarantee त्यात include होणार नाही.
ऊद्या उठून हात, पाय, डोळे आणि इतर कुठल्याही Part ची Replacement AMC मध्ये नसेल...
त्यासाठी Extra charge! हं आता तुम्हाला त्याचीही  AMC हवी असेल  तर काही packages आहेत...  
पण त्यालाही  guarantee मिळणार नाही.
म्हणजे
...

)पूर्ण maintenance मध्ये १६ सोमवार, ४ श्रावणी सोमवार, वर्षातून ३दा कुल्दैवताचे दर्शन, किंवा
इतर धर्मांनप्रमाणे उपास -तापास extra घ्यावे लागतील.
)Memory, Hard disk, power supply, या सारख्या गोष्टी खराब झाल्यास मिळणार नाही ... Company जबाबदार नाही.
) Agreement penalty Clause:- AMC मध्ये काही गडबड झाल्यास पुर्नजन्माची penalty फक्त
बाकी सगळे Clause पुढे लागू होतात...

.
.
.
अरे बापरे १० Mail alert server... झोपला बहूतेक!
देवा तू IT firm नको रे बाबा तू देवच बरा.
तूच आता मला वाचव रे बाबा

...

ऋतू









Tuesday, October 11, 2011

मूर्खांची लक्षणे: समर्थ रामदास स्वामी- दासबोध


समर्थ रामदास स्वामींचा दासबोधहा एक निव्वळ ग्रंथ नसून त्यात वैश्विक तत्वज्ञान सामवलेलं आहे. आज ह्या ब्लॉग मार्फत आम्ही समर्थ दासबोधातील "मूर्खांची लक्षणे" हया समासातील काही श्लोक येथे सार्थ प्रस्तूत करायचे धाडस करीत आहोत! मूर्ख कोण असतो ह्याची अनेक लक्षणे समर्थांनी लिहून ठेवलियेत, त्याचप्रमाणे "पढतमूर्खांची लक्षणे", "गुरू कोण?", "शिष्य कोण?" असे कित्येक प्रश्न समर्थ आपल्या अलौकिक प्रतिभाशक्तीतून दर्शवतात... सरळ साधे काही जगण्याचे नियम हेच “दासबोध” आहे... जय जय रघुवीर समर्थ!!



१) परस्त्रीसीं प्रेमा धरी| श्वशुरगृही वास करी |
कुळेंविण कन्या वरी| तो येक मूर्ख ||
(
जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासर्‍याकडे जाऊन राहतो, कूळ न बघता लग्नाला होकार देतो...तो मूर्ख)


२) आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||
(जो स्व:ताचेच गुणगान करतो, स्व:ताच्या घरातही पाहूणा असल्यासारखा वागतो, वडिलांच्या किर्तीवर भास मारतो... तो मूर्ख)

३) अकारण हास्य करी| विवेक सांगतां न धरी |
जो बहुतांचा वैरी| तो येक मूर्ख ||
(विनाकारण हसत बसतो, हुशार लोकांशी संबंध ठेवत नाही, जो खूप लोकांशी शत्रुत्व बाळगतो...तो मूर्ख)

४) बहुत जागते जन| तयांमध्यें करी शयन |
परस्थळीं बहु भोजन- | करी, तो येक मूर्ख ||
(सगळे जागे असताना जो त्यांच्यामधे जाऊन झोपतो (night out करताना ध्यानात ठेवा), दुसर्‍या घरी नको इतकं जेवतो..तो मूर्ख)

५) औषध न घे असोन वेथा| पथ्य न करी सर्वथा |
न मिळे आलिया पदार्था| तो येक मूर्ख ||
(आजारी असून औषध न घेणारा, पथ्य न पाळणारा, काहिही अरबट चरबट खाणारा मूर्ख... नकळत समर्थ सांगतात junk food खाऊ नये)

६) आदरेंविण बोलणें| न पुसतां साअक्ष देणें |
निंद्य वस्तु आंगिकारणें
| तो येक मूर्ख ||
(मान न ठेवता जो बोलतो, कोणी विचारलं नसतानाही आपलं मत व्यक्त करतो (
facebook users साठी), अनैतिक गोष्टी अंगिकारतो...तो मूर्ख) 

७) दोघे बोलत असती जेथें| तिसरा जाऊन बैसे तेथें |
डोई खाजवी दोहीं हातें
| तो येक मूर्ख ||
(पहिली ओळ तर साधी सरळच आहे समजायला, सगळे असतना दोन्ही हातानी जो डोके खाजवतो...तो मूर्ख)
 

८) कळह पाहात उभा राहे| तोडविना कौतुक पाहे |
खरें अस्ता खोटें साहे
| तो येक मूर्ख ||
(दोघे भांडत असताना त्याची मजा बघत जो तसाच उभा राहतो, खरं माहित असूनही खोटं सांगतो..तो मूर्ख)
 

९) लक्ष्मी आलियावरी| जो मागील वोळखी न धरी |
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी
| तो येक मूर्ख ||
(श्रीमंत झाल्यावर जो आधिच्या ओळखी विसरून जातो, तो मूर्ख)



१०) आपलें काज होये तंवरी| बहुसाल नम्रता धरी |
पुढीलांचें कार्य न करी
| तो येक मूर्ख ||
(आपलं काम होईपर्यंत जो अत्यंत विनम्र असतो आणि आपलं काम झालं की जो इतरांचं काम करायला मदत करत नाही..तो मूर्ख)



Monday, September 5, 2011

साहिब मेरा एक है- कबिर


Kabir was great saint, poet and philosopher! His ability to explain the most complicated life philosophy through a daily life example made him reach to masses. In this poem of his, he is talking about importance of ‘Guru’, ‘Mentor’, ‘The master’. Kabir says, ‘My Master is only one, without a second, and if I see multiplicity, it is also from my Master alone.’ Just read all of his “Dohe’ in this post… Some which are just awesome are explained by us…



साहिब मेरा एक है



साहिब मेरा एक है दुजा कहाँ न जाये
दुजा साहिब जो कहूँ, साहिब खडा रसाये.



माली आवत देखके, कलिया करे पूकार
फुल-फुल चुन लिये, काल हमारी बार

(Seeing the Master Gardener, the buds whisper to each other:

Fully blossomed ones are plucked away, our appointed day is near.)



चाह गयी, चिंता मिटी मनवा बेपरवाह
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह

(If cravings are dissolved, worries go, mind becomes free,
He who wants nothing is surely the king of all kings.)



हेत प्रीत सुन जो मिले, ता को मिलिये धाये,
अंतर राखे जो मिले
, तासे मिले बलाये


सब धरती कागद करु लेखनि सब बनराइ
सात समंदर की मसि करु हरि गुण लिखा न जाइ।

(If the entire earth is a writing tablet, all the forest be its pen,
all waters of seven seas be its ink – even then the Lord’s praises remain unfinished.)





अब गुरू दिल मे देखियाँ गावन को कछू नाही,
कबिरा जब हम गावते
, तब जाना गुरु नाही



मै लागा उस एक से एक भया सब माहि
सब मेरा मै सबन का
, तिहाँ दुसरा नाही


जा मरने से जग डरे मेरे मन आनंद,
कब मरहू कब पाऊ पुरण परमानंद

(The world trembles at the thought of death, but its a matter of joy for me,

When shall I die, when shall I find the perfect joy (of the vision of the Beloved)?)



सब बन तो चंदन नही, शूर के दल नाही,
सब समुंद्र मोती नही यूँ साधू जग माही



जब हम जग मै पग धरो, सब हसे हम रोये,
कबिरा अब ऐसी कर चलो पाछे हसी ना होये

(When you came to this mortal world, everyone around you were happy to see you and you were the only one weeping.

Kabir, now be in this world such that none laugh at your behind

but you yourself depart the world laughing, leaving all weeping mourning.)



अगुण किये तो बहू किये, करत ना मानी हार,
भावे बंदा बक्षे
, भावे गर्दन मार



साधू भुखा भाव का, धन का भुखा नाही,
धन का भुखा जो फ़िरे सो तो साधू नाही

(Having no appetite for material wealth, true saints are hungry only for love,

Those who thirst after material wealth are not saintly at all.)



कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर


करता था तो क्यूँ रहा अब काहे पछताये,
बोवे पेड बभूल का, आम कहासे खाये



साहिब सुन सब होत है, बन्दे ते कछु नाही,
राई ते परबत करे
, परबत राई माही



जियूँ तिल मै तेल है, जियूँ चकमक मै आग,
तेरा साई तुज़मे बसे
, जाग सके तो जाग

(Oil is found inside the sesame seed, inside Flintstone is fire, like that

Your Lord is within; now awaken to that truth if you dare!)



गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय


-संत कबिर




पाऊलचिन्हे


देव आहे- नाही ह्या वादात बरेच जणं जेव्हा अडकतात तेव्हा कुसुमाग्रज आपल्यातल्या आशावादाला देव मानतात आणि "त्याच" आस्तित्व दाखवातात. पहाटे अंधार दूर करून जो दिनकर आपल्याला प्रकाशाची पाऊलचिन्हे दाखवतो... तो देवच नाही का?



पाऊलचिन्हे



मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले
परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
पण तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
,
का चरण केदवा तुम्हास त्याचे दिसले



तो आहे किंवा नाही कुणा न लागे ठाव
प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव
गवसे न किनारा, फिरे जरी दर्यात
शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव!”



स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे
त्यांनाच पुसशी तू
, ’तो’ आहे की नाही!
-कुसुमाग्रज

Tuesday, August 16, 2011

ग्रेस...

ग्रेस...

ग्रेस हा मराठीतील असा एक कवि आहे जो समजावून सांगणं महाकठीण काम... ग्रेस साठी प्रत्येक शब्द हा मोजून मापून वापरलेला असतो... तो स्वत:विषयी म्हणतो... "I am not a poet of an evening, i am a poet of a twilight" (मी संध्याकाळचा कवि नाही..मी सांजेचा कवि आहे)... त्याच्याच काही कवितांमधील काही ओळी...वाचलेल्या, ऐकलेल्या आणि उमजलेल्या... प्रत्येक कवितेच्या पेरिच्छेदानंतर त्याचं विश्लेषण दिलय (मला उमजलेलं)
१)
हले काचपत्रातली वेल साधी
निनादून घंटा तश्या वाकल्या,
खिळ्यांना दिसेना कुठे क्रुस न्यावा
प्रभुने अशा पापण्या झाकल्या... ग्रेस

(परमेश्वर हे प्रकाशाचे प्रतीक आहे. वास्तवात जगणार्‍या पापी आणि पुण्यवान माणसांना हाच प्रकाश मार्ग दाखवत असतो. ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळे ठोकून मारणार्‍या मारेकर्‍यांनाही नंतरच्या विल्हेवाटीसाठी प्रकाशाची गरज भासली. बाहेर पाऊस कोसळत होता. सभोवताली अंधार होता. आणि प्रभूनेच पापण्या झाकल्यामुळे, प्रभुच्या डोळ्यातील अखंड प्रकाश शांतपणे निजून गेला मारेकर्‍यांसाठी...)
२)
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता.
(ह्या ओळी "ती गेली तेव्हा रिमझिम पाउस..." या कवितेतील आहेत ज्या निवडुंग चित्रपटात घेतली नाहीये...तिचं हे विश्लेषण...
आपल्या आईच्या अस्तित्वाचे, तिच्या स्त्रित्वाचे विश्लेषण देताना कवीला तिचा पुत्र न् ती त्यांची आई या नात्यापलिकडे जाउन विचार करावा लागतो, म्हणजेच एक पुरुष, नर म्हणून त्यांना तिच्याकडे एक मादी म्हणून पाहावे लागते. वास्तविक आईची न् लेकराची ताटातूट हा काही आनंददायी क्षण नसतो, आपली आई ही तिच्या मातृत्व भावनेच्या पलिकडे तिच्या देहस्वी भावनेकडे ओढली जाते, ती लेकराला सोडून जाते हे तेव्हा तिच्या मार्गात येत नाही...ती कुठे तरी गेली आहे पण मरण पावलेली नाही, वास्तविक ही ताटातूट कवीला एवढी अगतिक करून जाते, की ती व्यक्त करताना रसिकांचा अस समज होतो की ती म्हणजे त्यांची आई कालाच्या पडदया आड़ गेलीय, मरण पावलीय. पण ती काही काळ दूर जाणे हे सुद्धा कवीने इतक्या उत्कट शब्दांत मांडले आहे, "ती गेली तेव्हा रिमझिम पाउस..."
पण ती जेव्हा परत येते, तिचे परतणे कवीला एक पूर्ण पुरुष म्हणून आत्मविश्वास देणारे आहे.
ज्या कृष्णाने मयसभेत द्रौपदीच्या लज्जा रक्षणासाठी वस्त्रांचे आंतरपाट सोडले, तो कृष्ण एक पूर्ण नर, द्रौपदीच्या म्हणजे एक पूर्ण मादिच्या वस्त्रात नागडा होता तसा मी ही आईच्या मायेच्या वस्त्रात नागडा होउन जातो...)

३)

कृष्णएकांत- २

तिच्या अंगणातील प्राजक्त बंदी तरी सत्यभामे ढळे तोल का ?
झाडाप्रमाणे असे झाड हेही असे सांगते ती ,तरी हुंदका ?


इथे बासरीच्या गडे आतड्याला हवा चंदनी लाकडाची नवी;
तुला रुक्मिणी का फुले वेचताना सुगंधात हि भेटते वाळवी

संहार आता करा यादवांचे जुनी राजधानी रिकामी करा ;
रथाला कुणी अश्व देऊ नका अन शिरच्छेद माझे कसे हि धरा


वैरण आयुष्य झाले तरीही फुलांना कुणी बोल देऊ नये;
मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या गवाक्षातला चंद्र झाकू नये

नको धाक घालू नको हाक तोलू इलाख्यातली गुप्त झाली नदी ;निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो खुनाच्या कटातूनहि गारदी.


जिथे कृष्णएकांत देठात प्राजक्त राधेस हा रंग येतो कसा ?सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा .

(सत्यभामा आणि रुक्मिणी ह्या कृष्णाच्या पत्नी. आपण रुक्मिणीपेक्षा उजवं असावं हे सत्यभामेला कायम वाटायच आणि म्हणून तिने कृष्णाने दिलेले पारिजातकाचे झाड आपल्या अंगणात लावले परंतू तिच्या मनात असलेल्या मत्सरापायी त्या झाडाची फुलं रूक्मिणीच्या अंगणात पडायची! ह्या कवितेतून निरनिराळ्या व्यक्तीमत्वांचं व्यक्तीचित्रण तर केलच आहे पण सगळ्यात शेवटी कृष्णाचं दू:ख हलकेच मांडलय..आणि तो दु:खाचा वसाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा एकांतवास आहे...)