Wednesday, May 16, 2012

गुलमोहोर

(प्रेम निसर्गातही असतं आणि कवीच्या नजरेतून बघितल्यास त्या प्रेमाचं रूपांतर एका लग्नासारख्या घट्ट नात्यातही परावर्तीत होवू शकतं. उषातनय च्या ह्या कवितेतून काही अप्रतीम उपमा आपल्याला बघायला मिळतील...)


आता पावसा मातीशी कर लगीन साजरं,
गुलमोहोराचं कुकु तिच्या भांगामधी भर

बाभळीच्या हळदीनं व्हावा हळद सोहळा
गळा घालाया मातीच्या आण गारांच्या तू माळा
तुझी निघू दे वरात, बिजलीच्या तालावर

अक्षदाही टाकतील झाडं वाळल्या पानांच्या
ये रे पावसा म्हणता टाळ्या लागाव्या जनांच्या
उन्हाचाही अंतरपाट, व्हावा क्षणामधी दूर

माती येड्या आनंदानं जाइल दरवळून
तू घेताना कवळून लाजेल हिरवळून
तुमच्या मधूचंदराला, येवो जांभळा अंधार

अशी फुलव सईला व्हावा प्रेमानं प्रणय
यावे जन्माला तुमचे जणू पिकत तनय
वहळाच्या दूधधारा, व्हावे डोंगर उभार

कधी पावसा मातीला फारकत नको देऊ
तिच्या आधाराला राहो तुझे आभाळाचे बाहू
सूर्य लावील नादाला, तुला बोलावील वर
तरी पावसा तू तवा सोडू नको रे संसार
गुलमोहोराचं कुकु तुझं ठरू दे रे खरं

-उषातनय (प्रशांत केंदळे)

2 comments:

  1. baarrrr........bar........kay baat hai.....aaichya gavat.........nabhalya.....

    ReplyDelete
  2. Ushatanay mhanje kahar aahe... tyalahi nakki dakhav...

    ReplyDelete